
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गवरील आंबा घाटातील दख्खन जवळ सोमवारी सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. पाच यंत्राच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे.
गेले चार पाच दिवस पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे त्यातच महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कटाई करण्यात आलेल्या डोंगरामुळे राहिलेल्या डोंगराचा भाग सतत कोसळत असल्याने वाहतूकदार धास्तावले आहेत. त्यातच वाहतूक कोंडी होत आहे. सततच्या पावसामुळे दरड बाजूला हटविण्यास अडथळा येत आहे. तहसीदार व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.