
मुंबईत बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील गाड्या या 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहे. सर्व स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. संध्याकाळी पिक अवर्सच्या वेळेत लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
मुंबईत मंगळवार रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभर पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत.