
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हिंदुस्थानशी दहशतवादासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी खुली ऑफर दिली. मात्र, हिंदुस्थानने यादीतील कुख्यात दहशतवादी हिंदुस्थानकडे सोपवण्यावर आणि पाकव्याप्त कश्मीर यावरच चर्चा होईल, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला खडसावले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जैस्वाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये कोणताही संवाद पूर्णपणे स्वीपक्षीय स्वरुपाचा असावा, त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका मान्य केली जाणार नाही, असे ते म्हणाले. जोपर्यंत पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेला पीओके रिकामा करत नाही तोपर्यंत सिंधू जलवाटप करार रद्दच राहील अशी हिंदुस्थानची ठाम भूमिका आहे असेही ते म्हणाले.
त्याआधीच हिंदुस्थानने क्षेपणास्त्रे डागली -शरीफ
आमचे सैन्य हिंदुस्थानवर हल्ला करण्याची तयारी करत होते. 10 मे रोजी सकाळी नमाजानंतर हल्ला करण्यात येणार होता. परंतु त्याआधीच हिंदुस्थानी लष्कराने रावळपिंडी विमानतळासह पाकिस्तानच्या अनेक ठिकाणांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे डागली, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली आहे.