
गेल्या पाच महिन्यात राज्यातून 17 हजारहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. 2025 च्या पहिल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रातून 30 हजारहून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राज्य पोलिसांच्या ‘मिसिंग पर्सन्स डेटाबेस’वरून समोर आली आहे. याचा अर्थ दररोज सुमारे 200 लोक राज्यातून बेपत्ता होत आहेत. राज्यात सर्वाधित बेपत्ता होण्याचे प्रमाण हे मुंबईत आहे. जानेवारी ते मे या काळात एकूण 3 हजार 473 लोक बेपत्ता झाले असून जे राज्याच्या एकूण संख्येच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त अआहे.
टाईम्स ऑुफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. मुंबईची नंतर सर्वाधिक ठाण्याचून लोक बेपत्ता झाले आहे. ठाण्यात गेल्या पाच महिन्यात 2 हजार 3 लोक बेपत्ता झाले आहेत. मुंबईपेक्षा लहान असूनही ठाणे हे राज्यातील सर्वात दाट लोकसंख्या असलेले शहर आहे आणि तेथील बेपत्ता व्यक्तींची संख्या सातत्याने वाढत आहे. या यादीत एक धक्कादायक नाव म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये 1 हजार 411 लोक बेपत्ता झाले आहेत. पुण्यातून 1 हजार364 लोक बेपत्ता झाले, तर नाशिक ग्रामीणमधून 1 हजार 338 प्रकरणे नोंदवली गेली.
या एकूण आकड्यांमध्ये 18 वर्षांवरील प्रौढांचा समावेश आहे त्यात 12,467 पुरुष आणि 17,646 महिला आहेत. म्हणजेच एकूण 30,113 लोक बेपत्ता झाले आहेत. नागपूर शहरात 1,069 बेपत्ता प्रकरणे नोंदवली गेली आहेत नागपूर ग्रामीण भागातून 581 प्रकरणे आली आहेत, तर नागपूर रेल्वे विभागातून 15 प्रकरणे नोंदवली गेली.
महिन्यांनुसार ही आकडेवारी पाहिल्यास जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान बेपत्ता होणाऱ्यांच्या संख्येत सुमारे 3 टक्क्यांनी घट झाली होती. मात्र, मार्चमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. फेब्रुवारीत 2,197 पुरुष बेपत्ता झाले होते, तर मार्चमध्ये 2,576 झाले. महिलांमध्ये ही संख्या 3,027 वरून 3,546 वर गेली म्हणजे 17 टक्क्यांनी वाढ झाली होती. काही लोक घरगुती वादामुळे घर सोडून गेले असतात, काही मानसिक आजारांनी ग्रस्त असतात, काहींचं अपहरण झालेलं असतं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे हरवलेले असतात आणि त्यांचे मृतदेहही सापडलेले नसतात. बेपत्ता होण्यामागे अशी कारणं समोर आली आहेत.