अहिल्यादेवी स्मृतीस्थळ आणि तीर्थस्थळांसाठी साडे पाच हजार कोटींचा निधी, राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारने मंदिर आणि तीर्थस्थळ विकासासाठी साडे पाच हजार कोटींचा रुपयांचा निधी जाहीर केला आहे. राज्य सरकारचे नुकतेच अहिल्यानगरमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. अहिल्यानगरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळासाठी राज्य सरकारने 681.3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढच्या तीन वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण होईल.

फक्त अहिल्यानगरच नाही तर राज्यातील तीर्थस्थळांसाठी 5 हजार 503 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात अष्टविनायक मंदिरासाठी 147.8 कोटी, तुळजाभवानी मंदिरासाठी 259.6 कोटी, ज्योतिबा मंदिरासाठी 259.6 कोटी, त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी 275 रुपये, महालक्ष्मी मंदिरासाठी 1 हजार 445 कोटी तर माहुरगडाच्या विकासासाठी 829 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

बुधवारी झालेल्या बैठकीत सात प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी 147.8 कोटी रुपयांच्या अष्टविनायक मंदिराच्या विकास प्रकल्पाचा समावेश आहे. त्यापैकी 100 कोटी रुपये हे मंदिरांसाठी तर 47.4 कोटी रुपये हे मंदिरांच्या विद्युतीकरण आणि वास्तूशास्त्रीय सल्लागारासाठी देण्यात येणार आहे.