अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी 10 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली.

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता 3 जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

  • प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सुरू झाल्यानंतर राज्यभरातून विद्यार्थी नोंदणी करत आहेत. त्यामुळे वेबसाईटवर ताण येत आहे.