चाकरमान्यांना 1 सप्टेंबरपासून बोटीने कोकण गाठता येणार; बहुचर्चित रो-रो सेवा सुरू होणार, मुंबईहून जयगड तीन तासांत तर विजयदुर्ग पाच तासांत

मुंबईतून लाखो चाकरमानी होळी, गणेशोत्सव, उन्हाळी सुटीसाठी कोकणात जात असतात. त्यांना आता एसटी, कोकण रेल्वे, खासगी वाहनांशिवाय बोटीचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो सेवा सुरू होणार आहे. रो-रोद्वारे मुंबईहून जयगड तीन तासांत तर विजयदुर्ग पाच तासांत गाठता येणार आहे.

पेंद्रीय शिपिंग मंत्रालय आणि राज्याच्या बंदरे विभागाने या जलवाहतूक सेवेस अंतिम मंजुरी दिली आहे. या रो-रो सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एकूण 147 परवानग्या मिळाल्या आहेत. जयगड आणि विजयदुर्ग येथे रो-रो उभी करण्यासाठी जेट्टीची सुविधा असून तिथून शहरात जाण्यासाठी बसेसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 25 नॉट्स स्पीडची ही ‘एम टू एम’ नावाची रो-रो बोट असणार असून ती दक्षिण आशियातील वेगवान बोट असल्याचा दावा करण्यात आला आहे.  दुचारी, चारचाकी आणि मिनी बस वाहून नेण्याचीही रो-रोमध्ये क्षमता आहे. भविष्यात या ‘एम टू एम’ रो-रोला श्रीवर्धन, मांडवा असे विविध थांबे असणार आहेत.

आसन व्यवस्था

n इकोनॉमी क्लास                       – 552

n प्रीमियम इकोनॉमी                   – 44

n बिझनेस          – 48

n फर्स्ट क्लास     – 12

तिकिटाचे दर

n इकोनॉमी क्लास                       –  2500 रुपये

n प्रीमियम इकोनॉमी                   – 4000 रुपये

n बिझनेस क्लास                        – 7500 रुपये

n फर्स्ट क्लास     – 9000 रुपये

n चारचाकी वाहन                        – 6000 रुपये

n दुचाकी वाहन   – 1000 रुपये

n सायकल          – 600 रुपये

n मिनी बस        – 13 हजार रुपये