पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधितांसाठी पॅकेज जाहीर करा

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे प्रचंड नुकसान झालेल्या पूंछसह इतर भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेज जाहीर करा, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ज्या ठिकाणी पाकिस्तानी गोळीबारात 4 मुलांसह 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. पूंछमधील त्या ठिकाणाला अलीकडेच भेट दिली होती, असेही राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे. अचानक आणि अंदाधुंद गोळीबारामुळे अनेक भागात घरांचे प्रचंड नुकसान झाले. शेकडो घरे, दुकाने, शाळा आणि धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली. अनेकांनी सांगितले की, त्यांचे वर्षानुवर्षे केलेले कष्ट एका झटक्यात वाया गेले, असेही राहुल यांनी पत्रात म्हटले आहे.