
ऐन मे महिन्यात आलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील सोंडेवर,पंचनदी आणि शीळ ही तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. आठ धरणांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्याने मे महिन्याच्या अखेरीस भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईतून ग्रामस्थांची सुटका झाली. शीळ धरण मे महिन्यातच भरल्याने रत्नागिरी शहरावरील पाणीटंचाई आणि पाणी कपातीचे संकट टळले आहे.
मे महिन्यात अनेक धरणातील पाणीसाठा आटतो.काही धरणे कोरडी पडतात.यंदा मात्र मे महिन्यात आठवडाभर पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे.जिल्ह्यातील सोंडेवर,पंचनदी आणि शीळ हि तीन धरणे शंभर टक्के भरली.गुहागर,फणसवाडी,मालघर,खोपड,आंबतखोल,व्हेळ,ओझर,चिंचवाडी याधरणात 75 टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठा
धरण पाणीसाठा (टक्के)
पणदेरी. 42.42
तिडे 67.14
सोंडेवर. 100
पंचनदी. 100
आवाशी. 14.54
पिंपळवाडी. 38.16
कोंडीवली. 51.41
नातूवाडी. 28.44
पिंपर. 46.94
गुहागर. 96.20
अडरे. 54.15
असुर्डे. 38.20
गडनदी. 64.18
निवे. 23.38
शीळ. 100
मुचकुंदी. 39.71
झापडे. 70.07
अर्जुना 43.56
चिंचवाडी. 79.17