
आषाढातील आनंदवारी अनुभवण्यासाठी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसह दिंडी मंगळवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. टाळ-मृदंगाचा गजर, विठूमाऊलीचा जयघोष करीत निघालेल्या हजारो वारकर्यांच्या पावलांनी वेग घेतला आहे. त्र्यंबकेश्वरची वेस ओलांडून महानिर्वाणी आखाड्यात दिंडीचा पहिला मुक्काम होता. दैनिक सामनाचे फोटो जर्नलिस्ट भूषण पाटील यांनी या पालखी सोहळ्याची क्षणचित्रे कॅमेऱ्यात कैद केली.
1 / 9

तुम्ही आम्ही जाऊं चला भेटू जीवलगा विठ्ठला... भक्तिमय वातावरणात त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिरातून निघालेला पालखी रथ. (सर्व छायाचित्रे : भूषण पाटील)