विमानतळ परिसरातील 7 बेकायदा बांधकामे जमीनदोस्त; हायकोर्टात सरकारचे प्रतिज्ञापत्र

mumbai-airport

नियमांचे उल्लंघन करत मुंबई विमानतळाभोवती उभारण्यात आलेल्या टोलेजंग बांधकामांमुळे विमान उडण्यास अडथळे निर्माण होत आहे. याची गंभीर दखल घेत कारवाईबाबत दिरंगाई केल्याप्रकरणी हायकोर्टाने झापल्यानंतर सरकार ताळय़ावर आले. विमान उडण्यास अडथळा ठरणारी 7 बांधकामे पाडल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाने आज न्यायालयात सादर केले. भविष्यात आवश्यकता भासल्यास इतर प्राधिकरणाच्या मदतीने कारवाई करण्याची हमीही न्यायालयाला देण्यात आली.

नियम पायदळी तुडवत काही बिल्डरांनी विमानतळ परिसरातील उंच इमारती बांधल्या आहेत. या बांधकामांमुळे विमानांना धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा करत अॅड. यशवंत शेनॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.