जाईन गे माये तया पंढरपुरा! भेटेन माहेरा आपुलिया!! अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान

आळंदी ‘अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक ।।’ असे म्हणत टाळ-मृदंगांच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने गुरुवारी (19 रोजी) सायंकाळी लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवले, यावेळी ज्ञानोबा-तुकोबांच्या नामघोषाने अलंकापुरी दुमदुमून गेली.

पावसाच्या सरी अंगावर झेलत ‘माउली… माउली… ‘च्या जयघोष करीत पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम परंपरने जुना गांधी वाडा या आजोळघरी झाला. यावेळी गांधी परिवारातर्फे स्वागत, पूजा आणि समाजआरती करण्यात आली. शुक्रवारी (२० रोजी) पालखी सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यात विसावेल.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य दिंडयांतील वारकऱ्यांनी टाळ-मृदंगांच्या गजरात माउलींच्या जयघोषाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन गेले. गुरुवारी पहाटेपासूनच वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करून माउलीच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनबारी रांग आणि अलंकापुरी भाविकांनी फुलली होती. नुकत्याच विकसित केलेल्या दर्शनवारी लोखंडी पुलावरून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. पावसाच्या सरी अंगावर झेलत वारकऱ्यांनी देहभान विसरून फेर, फुगड्यांचा आनंद घेतला.

माउलीच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गुरुवारी पहाटे घंटानाद, काकड आरती आणि अभिषेक करण्यात आला. महापूजा व समाधी दर्शन व्यवस्था करण्यात आली होती.

पालखीमार्गावर पाच किमीवर ‘आपला दवाखाना’

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील वीणा मंडपातून माउलींच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी रात्री प्रस्थान झाल्यानंतर पालखीने मंदिरप्रदक्षिणा घातली, प्रस्थानापूर्वी सोहळ्यातील मानाच्या 47 दिंड्यांसह उपदिंड्यांना मंदिरात हरिनाम गजरात प्रवेश देण्यात आला. माउलींना पोशाख व गुरू हैवतबाबा यांच्या वतीने परंपरागत मानाची आरती झाली. त्यानंतर संस्थानची आरती च मानकऱ्यांना नारळ प्रसादवाटप परंपरेने करण्यात आले. त्यानंतर वीणा मंडपात सजलेल्या पालखीत माउलींच्या चलपादुका ठेवण्यात आल्या. देवस्थानतर्फे मानकऱ्यांना मानाच्या पागोटीचे वाटप झाले. त्यानंतर आळंदीकर ग्रामस्थ व सेवकांनी हरिनामाच्या गजरात माउलींची पालखी बीणा मंडपातून बाहेर आणली. नंतर मंदिर प्रदक्षिणा करून देऊळवाक्चातून पालखी सोहळ्याने रात्री उशिरा प्रस्थान ठेवले, ‘पुंडलिक बरदेऽऽ हरि विठ्ठलऽऽऽ’ च्या जयघोषात मंदिर व ग्रामप्रदक्षिणा करीत आळंदी ग्रामस्थ व खदिकरी यांनी पालखी महाद्वारातून मंदिराबाहेर आणली. ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी सोहळा आळंदीतील गांधी बाडा अधांत आजोळघरी रात्री उशिरा समाजआरतीने विसावला. शुक्रवारी पालखी सोहळा आळंदीकरांचा निरोप घेत पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. आजोळघर, मंदिर परिसर, इंद्रायणी नदीघाटावर पोलीस बंदोबस्त तैनात नला होता.

पिठलं-भाकरीचा महाप्रसाद

भाविकांच्या दिंड्यांनी सकाळपासूनच हरिनामाचा गजर करीत ग्रामप्रदक्षिणा केल्या. यावेळी भाविकांना पिठलं-भाकरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. साक्षरतेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाने ‘वारी साक्षरतेची’ या चित्ररथाचा वारीमध्ये समावेश केला आहे. दरम्यान, नदीत स्नान करताना पाण्याची पातळी वाढल्याने यवतमाळमधील अमोल राठोड वाहून गेले होते. मात्र, आपत्तिव्यवस्थापन पथकाने त्यांना वाचविले. राठोड यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.