बंगळुरू शहर प्रदूषणाने मारतंय… व्यावसायिक दांपत्याचा शहर सोडण्याचा निर्णय

छोटा व्यवसाय करणाऱ्या एका दाम्पत्याने बंगळुरुमध्ये दोन वर्षे घालवली. आता मात्र त्यांनी बंगळुरू शहर सोडायचे ठरवले आहे. आम्हाला वाटतंय की बंगळुरू हळूहळू आम्हाला मारत आहे असे म्हणत या दोघांनीही शहर सोडण्याचा निर्णय घेतला. या दोघांची पोस्ट व्हायरल होतेय. अश्विन आणि अपर्णा दोघेही कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करतात. त्यांनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे. या जोडप्याने पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.

बंगळुरू आम्हाला हळूहळू मारतंय असे आम्हाला वाटत आहे. त्यामुळे आता आम्ही हिंदुस्थानची सिलिकॉन व्हॅली समजले जाणारे शहर सोडतो आहोत. आम्ही राहायला सुरुवात केली तेव्हा इथले लोक खूप चांगले आहेत, वातावरणही खूप चांगले आहे हे आम्हाला लक्षात आले. पण एक काळ लोटल्यानंतर वातावरणात बदल होऊ लागले. आम्ही इथे सारखे आजारी पडू लागलो. इथे राहू लागल्यानंतर मला आता श्वास घेण्यासंबंधीचा त्रास उद्भवला आहे. अश्विन याने तर मला सर्दी आणि खोकला होणं हा त्रास सारखा होऊ लागला आहे, असे सांगितले.