
नव्याने नावनोंदणी केलेल्या मतदारांना त्यांच्या नावांची मतदार यादीत नोंद झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांच्या आत मतदार ओळखपत्र (EPIC) मिळणार आहे. 18 जून पासून निवडणूक आयोगाने ही सेवा सुरू केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. निवडणूक आयोगाची ही सेवा फक्त नव्या मतदारांसाठीच नव्हे, तर पत्ता बदलेल्या, माहिती दुरुस्ती केलेल्या अर्जदारांनाही मिळणार आहे.
या नव्या सेवेत ECINet या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आयटी मॉड्यूल तयार करण्यात आले आहे, जे इंडिया पोस्टच्या API (Application Programming Interface) सोबत जोडलेले आहे. यामुळे पूर्वी 30 ते 45 दिवस लागायचे त्याऐवजी फक्त 15 दिवसांत ही सेवा मिळणार आहे.
राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या पद्धतीमुळे मतदार ओळखपत्र तयार होण्यापासून ते घरी पोहोचण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर SMS अलर्ट आणि रिअल-टाइम ट्रॅकिंगची सुविधा मिळणार आहे, ही प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान असून सुरक्षित असणार आहे. मतदार यादीत नवीन नाव नोंदवलेल्या मतदारांनी सांगितले की, ही व्यवस्थेमुळे कार्ड हरवण्याची शक्यता कमी असणार आहे. या व्यवस्थेमुळे तुमचे मतदार कार्ड कुठे असणार आहे याची माहिती मतदारांना मिळणार आहे.