
उत्तरकाशीत यमुनोत्री पायी मार्गावर सोमवारी भूस्खलन झाल्याची घटना घडली. येथील नौ कांचीजवळ टेकडी कोसळली. दुर्घटनेत 2 ते 3 यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ पथक आणि पोलीस घटनास्थळी दखल झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शार्दुल सिंह गुसाई यांनी घटनेची पुष्टी केली आहे. भूस्खलनामुळे दोन ते तीन लोक गाडले गेल्याची माहिती गुसाई यांनी दिली. माहिती मिळताच जानकी चट्टी आणि इतर ठिकाणांहून मदत आणि बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत, असे गुसाई म्हणाले.