गाझामधील नरसंहारावर पंतप्रधान मोदींच्या मौनाने हिंदुस्थानच्या नैतिक आणि राजनैतिक पतला ठेच बसली, काँग्रेसची टीका

गाझा पट्टीत इस्रायलचा नरसंहार सुरूच आहे असे विधान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले आहे. तसेच यावर पंतप्रधान मोदींनी मौन साधले आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या नैतिक आणि राजैनितक पतला ठेच बसली आहे अशी टीका रमेश यांनी केली आहे.

इस्रायल आणि इराणच्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. पण गाझा पट्टीत सुरु असलेल्या युद्धावर कुठलीही शस्त्रसंधी नाही. इस्रायलकडून तिथे नरसंहार सुरूच आहे.

गेल्या दीड वर्षांपासून पॅलेस्टाईन नागरिकांवर झालेल्या या अन्यायावर आणि नरसंहारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेले मौन यामुळे हिंदुस्थानच्या नैतिक आणि राजैनितक पतला ठेच बसली.