
तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच असे वादग्रस्त विधान भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केले होते. ही सत्तेची मुजोरी कुणा मुळे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, हा हे खरंय…. फक्त हेच नाही. युद्ध तुम्हीच थांबवता…2014 नंतर भारत तुमच्यामुळेच स्वतंत्र झाला.. जी काही प्रगती झाली तुमच्यामुळेच झाली… झाडं फळं तुमच्यामुळेच देतात.. नद्या तुमच्यामुळेच वाहतात… लोकं सकाळी उठून कामाला तुमच्यामुळेच जातात… एवढंच कशाला…
सूर्य तुमच्यामुळेच उगवतो… बस का अजून काही बाकी आहे… कसं आहे माहितेय का भरलेल्या गाडीच्या मागं पुढे पळून एखाद्याला वाटतं त्याच्यामुळेच गाडी ओढली जाते… असतो एखाद्याचा गैरसमज चालायचंच
ही सत्तेची मुजोरी कुणा मुळे? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
हा हे खरंय….
फक्त हेच नाही
युद्ध तुम्हीच थांबवता…
२०१४ नंतर भारत तुमच्यामुळेच स्वतंत्र झाला..
जी काही प्रगती झाली तुमच्यामुळेच झाली…
झाडं फळं तुमच्यामुळेच देतात..
नद्या तुमच्यामुळेच वाहतात…
लोकं सकाळी उठून कामाला तुमच्यामुळेच जातात…
एवढंच कशाला…
सूर्य तुमच्यामुळेच… pic.twitter.com/77OCogWDwY— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 26, 2025