मला अजूनही तुझ्यावर विश्वास; परत ट्रॅकवर ये! सचिन तेंडुलकरचे शब्द देताहेत पृथ्वी शॉला कमबॅकचं बळ

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. आयपीएल 2025 च्या लिलावावेळी एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. तसेच मुंबईच्या संघातही त्याला जागा मिळाली नव्हती. त्यामुळे पृथ्वीसाठी हा कठीण काळ आहे. याच दरम्यान त्याने एका मुलाखतीमध्ये या कठीण काळात क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्याला लढण्याचे बळ दिल्याचे सांगितले.

पृथ्वी शॉ हा शालेय जीवनापासून क्रिकेटचे मैदान गाजवत आला आहे. मुंबईतील प्रतिष्ठेच्या हॅरिस शिल्ड स्पर्धेत त्याने 546 धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये त्याने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते आणि संघाला वर्ल्डकपही जिंकून दिला होता. त्याच्याच नेतृत्वाखाली शुभमन गिल, अर्शदीप सिंग हे खेळाडू खेळले होते. या दोघांपूर्वी पृथ्वीने कसोटीत पदार्पण केले होते. पहिल्याच कसोटीत त्याने शतकही झळकावले होते. मात्र चुकीची संगत आणि मैदानाबाहेरील कारनाम्यांमुळे त्याच्या कारकि‍र्दीला ब्रेक लागला. आधी तो टीम इंडिया, नंतर आयपीएल आणि मुंबईच्या संघातूनही बाहेर गेला. आता त्याला शून्यापासून सुरुवात करावी लागत आहे.

आपण भरकटलो होतो. चुकीची संगत, चुकीचे मित्र, वाईट निर्णय आणि शिस्तीचा अभाव जाणवू लागल्याचे पृथ्वी शॉ याने कबूल केले. आता तो आपल्या कारकि‍र्दीला पुन्हा आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच त्याने मुंबईचा संघ सोडून इतर संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि तसे पत्र एमसीएला लिहिले होते. त्याला याबाबत परवानगीही मिळाली असून तो महाराष्ट्राच्या संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. या प्रवासादरम्यान आपल्याला सचिन तेंडुलकर यांचे शब्द बळ देतात अशी भावना त्याने व्यक्त केली.

Ind Vs Eng Test Match : शतकाला द्विशतकात बदल, अश्विनचे पंतला आवाहन

कठीण काळात सचिन सर माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांना माझा प्रवास माहिती आहे. अर्जुन आणि मी 8-9 वर्षांचे असल्यापासून मित्र आहोत. आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो, वाढलो. सचिन सरही कधीकधी आमच्यासोबत असायचे. दोनच महिन्यांपूर्वी माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. जेव्हा तुम्ही भरकटलेले असता तुम्हाला अशा मार्गदर्शनाची गरज असते.

सचिन सर मला म्हणाले की, पृथ्वी माझा अजूनही तुझ्यावकर विश्वास आहे. मी तुला मोठा होताना पाहिले आहे. पूर्वीप्रमाणे परत ट्रॅकवर येते. पुढील 13-14 वर्षात सर्वकाही शक्य आहे, असेही पृथ्वीने सांगितले.

‘शॉर्ट रन’ महागात पडणार, आयसीसीच्या नव्या नियमांमुळे पंचांच्या अधिकारांमध्ये वाढ