ज्यांनी स्वतःच्या कार्यालयावर दशकानुदशके तिरंगा फडकावला नाही, राष्ट्रगीत-राष्ट्रगान गायले नाही तेच आज वंदे मातरमच्या गौरवावर भाष्य करत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. तसेच आज आपण वंदे मातरमच्या 125 वर्षांचा उत्सव करत असू तर थोडे आत्मपरीक्षण आवश्यक आहे असेही अरविंद सावंत म्हणाले.































































