
90 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री तब्बल 25 वर्षांनी मुंबईत आली. यानंतर तिने महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनली. मात्र काही कारणास्तव तिला या पदावरून हटवण्यात आले. या सगळ्या प्रकरणामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती. आता पुन्हा एका ती एका पाकिस्तानविषय़ी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेच आली आहे. मुसलमानांबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे, असे विधान तिने केले आहे.
दिल्लीत माध्यमांशी बोलताना अभिनेत्री ममता कुलकर्णीने पाकिस्तानबाबत भाष्य केलं. मुसलमानांबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे. त्यांनीसुद्धा मला खूप प्रेम दिलं आहे. विशेषतः दुबईमध्ये. तिथे माझी अध्यात्मिक साधना 25 वर्ष चालली होती. त्या काळात मला खूप शांतता मिळाली आणि प्रेम मिळालं, असे ती यावेळी म्हणाली.
Delhi: Sadhvi Mamta Kulkarni says, “I have a lot of love for Muslims. And they have given me a lot of love in return. My spiritual practice spanned 25 years, and I received immense peace and love, especially during my time in Dubai, where I meditated at one place. When I was a… pic.twitter.com/AxOxWRsATN
— IANS (@ians_india) May 30, 2025
दरम्यान पाकिस्तानातून तिच्या चाहत्यांकडून तिला दररोज पत्र देखील यायची, असेही ममताने सांगितले. जेव्हा मी बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होते, तेव्हा मला पाकिस्तानमधून दररोज 50 तरी पत्रं यायची. त्यामुळेच माझ्या मनात मुसलमानांबद्दल खूप प्रेम आहे. पण दहशतवाद्यांबद्दल मात्र माझ्या मनात अजिबात प्रेम नाही. कारण दहशतवादी हा फक्त दहशतवादीच असतो. तो कधीच कोणाचा नवरा नसतो, कधीच कोणाचा पिता नसतो, आणि ना कोणाचा मुलगा असू शकतो. तो फक्त एक दहशतवादी आहे, असे यावेळी ममता म्हणाली.
सध्या हिंदुस्थान पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशातच ममताने केलेली पाकिस्तान बाबतची विधाने चर्चेचा विषय ठरत आहे.