
एमएमआरडीएने एल्फिन्स्टन पूल बंद केल्यामुळे होणारा संभाव्य वाहतुकीचा खोळंबा रोखण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे केली आहे.
एमएमआरडीएने एल्फिन्स्टन पूल बंद केला असून यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. त्यातच शीव पूल आणि लोकमान्य टिळक पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने अधिक गैरसोय होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पूर्व-पश्चिम जोडमार्गावर तसेच विशेषतः माहीम, दादर, वरळी, शिवडी परिसरात अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देवेन भारती यांच्याकडे केली आहे.
…तर गंभीर परिस्थिती उद्भवेल
एमएमआरडीए व महानगरपालिका यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे मुंबईकरांसाठी वाहतुकीची परिस्थिती अतिशय गंभीर होऊ शकते, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.