
वर्धापन दिनानिमित्त मुंबई केवळ ठाकरे यांचीच असे बॅनर्स सभागृहाबाहेर लावण्यात आले आहेत. मात्र हे बॅनर्स साफ चुकीचे आहेत. मुंबई हीच केवळ ठाकरे यांची नाही तर पूर्ण महाराष्ट्र ठाकरे यांचा आहे. आज शिवसेनेच्या या वर्धापनदिनी दोन-तीन वर्षांचे लोकही 59 वर्षांचे झाले आहेत. काही लोक येतात आणि जातात, पण शिवसेनेसारख्या 59 वर्षांच्या संघटनेला हे दोन-तीन वर्षांचे लोक संपवू शकत नाहीत, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाला लगावला. दरम्यान, केवळ आश्वासन देणाऱया महायुती सरकारला जाब विचारणारे ‘क्या हुआ तेरा वादा’ हे मराठवाडय़ापासून सुरू झालेले शेतकऱयांचे आंदोलन आता महाराष्ट्रभरात फैलावणार आहे. युती सरकारने दिलेल्या 25 आश्वासनांपैकी 10 आश्वासने समोर ठेवून सरकारला जाब विचारला जात आहे. यात कर्जमाफी, वीजमाफी असे महत्त्वाचे विषय आहेत. यापुढे आता शेतकऱयांना कर्ज नाकारणाऱया बँकांविरोधात आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱयांना कर्ज मिळाले पाहिजे. शेतकऱयांचा हा लढा राज्यभरात व्यापक झाला पाहिजे, असे दानवे म्हणाले.