पाऊलखुणा – वाराणसीतील जंतरमंतर

>> आशुतोष बापट

वाराणसी ही केवळ एक नगरी नाही, तर ती भारतीय संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. येथे धर्म आणि तत्त्वज्ञान, कला आणि संगीत, साहित्य आणि खगोलशास्त्र यांचा अद्वितीय संगम आहे. ही नगरी मृत्यूतूनही मोक्षाचा संदेश देणारी, जीवनाच्या अस्थिरतेतून शाश्वत सत्याचे भान देणारी, म्हणूनच वाराणसीला `भारताचा आत्मा’ म्हणतात.

भारतातील सात मोक्षपुरी समजल्या गेल्या आहेत त्यातले वाराणसीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देवाधिदेव महादेव इथे विश्वनाथाच्या रूपात वसलेले आहेत, तर माता पार्वती प्रत्यक्ष अन्नपूर्णेच्या रूपात इथे असून तिचा वरदहस्त या नगरीवर राहिलेला आहे. वाराणसी धार्मिक शक्तिकेंद्र अस}s तरी खगोलशास्त्र, त्याचे अभ्यासक आणि त्यांनी तयार केलेली उपकरणे हीसुद्धा वाराणसीची खासियत आहे. भारतातील सांस्कृतिक इतिहासात खगोलशास्त्र आणि गणित या शास्त्रांना एक विशेष स्थान आहे. वेदकाळापासून ते आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त यांसारख्या महान गणितज्ञ-खगोलज्ञांपर्यंत भारताने जगाला अनेक मौलिक संकल्पना दिल्या. ग्रह-नक्षत्रांचे गणन, ग्रहणांची भाकिते, पंचांग निर्मिती, कालमापन यांमध्ये भारतीय खगोलशास्त्राचा गौरवशाली वारसा आहे. या परंपरेचा परिपाक म्हणूनच अठराव्या शतकात जयपूरचे शासक महाराजा जयसिंग द्वितीय यांनी अद्वितीय खगोलशास्त्राrय वेधशाळा उभारल्या.

सन 1724 ते 1737 या कालावधीत त्यांनी पाच महत्त्वाच्या वेधशाळा बांधल्या. त्या जयपूर, दिल्ली, मथुरा, उज्जैन आणि वाराणसी येथे उभारल्या गेल्या. या वेधशाळा आज `जंतरमंतर’ म्हणून ओळखल्या जातात. या ठिकाणी प्रचंड आकारमानाची भौमितिक साधने, सूर्यघटिका, भिंतींवर कोरलेले चाप, भूमितीय यंत्रे अशा स्वरूपाची संरचना बांधली गेली. त्या काळात दुर्बिणी किंवा सूक्ष्म यंत्रे भारतात सहज उपलब्ध नसल्याने जयसिंग यांनी प्रचंड आकारमानाची स्थिर वास्तू स्वरूपातील उपकरणे तयार करून ग्रह-नक्षत्रांचे स्थान, उंची, कोन इत्यादींची अचूक मोजणी साध्य केली. या यंत्रांच्या सहाय्याने ग्रहणांचे गणित, पंचांग निर्मिती, ऋतुपा यांचा अभ्यास अधिक अचूकतेने करता आला. यामध्ये वाराणसीतील वेधशाळेचा इतिहास वेगळ्याच कारणाने महत्त्वाचा ठरतो. वाराणसी ही प्राचीन काळापासून खगोलशास्त्र व गणित यांचे प्रमुख केंद्र राहिले आहे. काशीतील पंडित, वेदशाळा आणि शास्त्रचर्चा यामुळे येथे खगोलज्ञानाची अखंड परंपरा होती. त्यामुळे जयसिंग यांनी वाराणसी येथे वेधशाळा बांधणे स्वाभाविक होते. अधिकृत नोंदीनुसार ही वेधशाळा 1737 च्या सुमारास पूर्ण झाली.

वाराणसीतील प्रसिद्ध अशा दशाश्वमेध घाटाजवळ असलेल्या मनमंदिर घाटावर अशाच एका खगोलशास्त्राrय जंतरमंतरची निर्मिती केलेली दिसते. गंगेच्या काठी मनमंदिर घाटावर पूर्वाश्रमीच्या एका हवेलीच्या छतावर जयसिंगाने आपली ही वेधशाळा उभारली आहे. सम्राट यंत्र, पायंत्र, नाडी वलय यंत्र ज्यांच्या सहाय्याने आपल्याला रात्रीच्या आकाशातील नक्षत्र, तारे आणि ग्रहगोलांचे वेध, निरीक्षणे करता येतात अशी काही उपकरणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यातील सम्राट यंत्र हे एक वैशिष्टय़पूर्ण यंत्र आहे, ज्याच्या सहाय्याने आपण दिवसा सूर्याच्या सावलीचा उपयोग करून अचूक स्थानिक वेळ सांगू शकतो. खरे तर हे यंत्र म्हणजे एक मोठे सूर्याच्या सावलीचे घडय़ाळ आहे (एल्ह अत्). या सम्राट यंत्राच्या सहाय्याने आपल्याला अचूक स्थानिक वेळ मोजता येते.

सम्राट यंत्र या उपकरणात एक मोठा काटकोन त्रिकोणी आकाराचा उहदस्aस् असतो. याच्या हायपोटेनियस म्हणजे कर्णाची बाजू आपण ज्या ठिकाणाहून बघतो, त्या ठिकाणच्या अक्षांशाइतकी कललेली असते. ( The gnoman’s inclination equal to the latitude of the observer’s place ) याचाच दुसरा अर्थ असा की, हा Gnoman रात्रीच्या आकाशातील त्या ठिकाणच्या ध्रुव ताऱयाकडे निर्देश करतो. तो थेट आपल्याला उत्तर दिशा दाखवतो. या Gnoman च्या डाव्या आणि उजव्या हाताला पूर्व व पश्चिम दिशेत दोन अर्ध वर्तुळाकृती ण्aत्ग्ंratाd प्aत्न पाहायला मिळतात. सूर्य ज्या वेळी पूर्वेला उगवतो तेव्हा त्याची सावली पश्चिमेकडील या अर्ध वर्तुळाच्या एका भागावर पडते. सूर्य माध्यानानंतर पश्चिमेला झुकला की, त्याची सावली पूर्वेकडील अर्धवर्तुळाच्या भागावर पडते. या दोन्ही भागांवर वेळेचे आकडे नोंदवलेले असतात.

सूर्याची सावली या अर्धवर्तुळाच्या एका भागावर पडल्यानंतर त्यावरील जी वेळ आपल्याला मिळते ती स्थानिक वेळ असते. त्यात स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळेतील त्या स्थानासाठीचा फरक मिळवल्यानंतर आपल्याला अचूक भारतीय प्रमाण वेळ (घ्एऊ) म्हणजेच आपल्या घडय़ाळात किती वाजले आहेत ते कळते. काय अद्भुत आहे ना हे सर्व? खगोलीय निरीक्षणाची ही राजा जयसिंगाची उपकरणे, वेधशाळा त्या वेळच्या प्रगत खगोलीय निरीक्षणातील भारताच्या योगदानाचे महत्त्व आणि महात्म्य सांगतात हे नक्की. वाराणसी येथे भेट देणारे फार कमी पर्यटक दुर्दैवाने आपल्या या ऐतिहासिक खगोलीय वारसा स्थळाला भेट देतात.

ही सगळी वास्तू भारतीय पुरातत्त्व खात्याने उत्तम राखली आहे. तिथे वाराणसीची ओळख सांगणारी म्युरल्स, चित्रे काढलेली आहेत. वाराणसीवर आधारित सुंदर अशी 10 मिनिटांची फिल्म दाखवली जाते. तसेच हवेलीतील एका मोठय़ा दालनात भगीरथाने स्वर्गातून आणलेली गंगा या विषयावर आधारित दाखवला जाणारा लेझर शो डोळ्यांचे पारणे फेडतो.

(प्रकाशचित्रे आणि तांत्रिक माहिती : पराग लिमये)
(लेखक लोकसंगिताचे अभ्यासक आहेत)
[email protected]