
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध युद्धापर्यंत ताणले गेले असतानाच महाराष्ट्र एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱया ठाण्यातील एका तरुणाला पकडले. पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या संपका&त राहून त्यांना हिंदुस्थान सरकारने प्रतिबंधित केलेल्या मुंबईतील संवेदन क्षेत्रातील गोपनीय माहिती तो पुरवीत होता. हनी ट्रपमध्ये अडकवून पीआयओ त्या तरुणाकडून हेरगिरी करून घेत होते, असे एटीएस सूत्रांकडून सांगण्यात येते.
ठाण्याच्या कळवा परिसरात राहणारा एक तरुण पीआयओच्या संपका&त असून तो हिंदुस्थान सरकारने प्रतिबंधित केलेल्या मुंबईतील संवेदन क्षेत्राची माहिती त्यांना पुरवीत असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या ठाणे युनिटने त्या तरुणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता नोव्हेंबर 2024 रोजी त्याची फेसबुकवर एका पीआयओशी ओळख झाली होती. तसेच त्याने नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत त्या पीआयओला व्हॉट्सअपद्वारे हिंदुस्थान सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राची गोपनीय व संवेदनशील माहिती वेळोवेळी पुरविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे एटीएसच्या ठाणे युनिटने त्याला अटक केली.
रवी वर्मा (27) असे त्या तरुणाचे नाव असल्याचे समजते. तो ठाण्यातल्या कळवा येथे त्याच्या आईसोबत राहतो. तसेच मुंबईतील एका खासगी डिफेन्स टेलॉजी कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता आणि त्या कंपनीच्या माध्यमातून त्याला नोव्हेल डॉकवर जाण्याचा अॅक्सेस होता असे एटीएस सूत्रांकडून सांगण्यात येते. याचाच त्याने गैरफायदा उचलला. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. रवी व्यतिरिक्त आणखी दोघा व्यक्तींविरोधात एटीएस पोलीस ठाण्यात शासकीय गुपिते अधिनियम 1923 चे कलम 3 (1), 5 (अ) सह भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 61 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाणे एटीएस युनिट अधिक तपास करीत आहे.