
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषनाचा चौथा दिवस आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. मात्र राज्य सरकारने अजूनही याची दखल घेतलेली नाही. यातच प्रहार संघटना आता आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे.
आज शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.
VIDEO | Mumbai: Prahar Janshakti Party workers stage protest outside Mantralaya in support of party chief and former Maharashtra Minister Bacchu Kadu’s hunger strike.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/9bQ53ni4FR
— Press Trust of India (@PTI_News) June 11, 2025