‘ते’ शिवसेनेच्या करंगळीला पकडून राज्याचे, देशाचे राज्यकर्ते झाले – भास्कर जाधव

गेली 35 वर्षे ज्यांच्याबरोबर मैत्री झाली, ज्यांचा महाराष्ट्रात नामोल्लेखही नव्हता, लवलेशही नव्हता ते शिवसेनेच्या करंगळीला पकडून आज ते या राज्यात नाही तर देशाचे राज्यकर्तेही झाले. देशाचे राज्यकर्ते झाल्यानंतर ज्या मित्रामुळे, ज्यांच्या विचारामुळे, ज्यांनी पहिल्यांदा या देशात हिंदुत्वाची भूमिका मांडली त्या शिवसेनेला संपवण्याचा हेतू भारतीय जनता पक्षाने ठेवला आहे. मात्र, आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

ािशिवसेनेच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2014 साली भाजपने कोणतेही कारण नसताना शिवसेनेबरोबरची युती तोडली. शिवसेनेविरोधात अख्या देशातील नेते मंडळी निवडणुकीच्या प्रचारात उतरवली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी एकटय़ाच्या बळावर 63 आमदार निवडून आणले. त्यानंतर अमित शहा युतीसाठी मातोश्रीवर येऊन गेले. मात्र. नंतर अचानक अजित पवारांबरोबर 80 तासांचे सरकार स्थापन करून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात जाधव यांनी केला