
देशातील निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असून त्यामुळेच त्यांनी मतदान प्रक्रियेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, संग्रहित फोटो निवडणुकीनंतर 45 दिवसांत नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे, असा गंभीर आरोप समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सर्वात मोठे डेटा सेंटर उत्तर प्रदेशात उभारण्यात येणार असल्याचा दावा मोदी सरकार करत आहे. राज्य सरकार डेटा सेंटर मालकांसाठी विशेष पॅकेजही देणार आहे. जर अशा प्रकारचे मोठे डेटा सेंटर उभारण्यात येणार असेल तर निवडणुकीचा डेटा कुठे साठवायचा असा प्रश्न निर्माणच कसा होऊ शकतो, असा सवालही अखिलेश यादव यांनी केला.