
पाच सामन्यांच्या तेंडुलकर-अँडरसन करंडकाची इंग्लंडने विजयी सुरुवात केली आहे. लीड्स येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 5 विकेटने पराभव केला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन डावांमध्ये केलेल्या दमदार फटकेबाजीमुळे आणि टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने झळकावलेल्या पाच शतकांमुळे टीम इंडिया सामना जिंकणार असंच सर्वांना वाटत होतं. परंतु इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात संयमी फलंदाजी करत टीम इंडियाने दिलेल्या 371 धावांच्या आव्हानांचा यशस्वी पाठलाग केला आणि सामना खिशात घातला.