
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 20 जून पासून सुरू होणार आहे. मात्र मालिका सुरू होण्यापूर्वी मालिकेच पूर्वीच “पतौडी करंडक” हे नाव इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) बदलण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेच्या नावात बदल झाला. पाच सामन्यांची ही कसोटी मालिका आता तेंडुलकर-एण्डरसन यांच्या नावाने खेळली जाणार आहे. यामुळे टीम इंडियाच्या अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ECB ने विजयी कर्णधाराला “पतौडी पदक” देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.
मालिकेच्या नावाद बदल केल्यामुळे टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्यासह अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त करत पतौडी कुटुंबाच्या योगदानाचा हा अपमान असल्याच म्हटलं होतं. त्यानंतर खुद्द सचिन तेंडुलकरने सुद्धा ईसीबीसोबत संपर्क साधत पतौडी नावाचा वारसा इंडिया-इंग्लंड मालिकेत कायम राहिला पाहिजे, अशी मागणी केली होती. BCCI ने दिलेल्या माहितीनुसार, ECB ने विजेत्या कर्णधाराला पतौडी पदक देण्याची घोषणा केली आहे. लॉर्ड्समध्ये पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान पतौडी पदकाची घोषणा करण्यात येणार होती. परंतु अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे आता पहिल्या पतौडी पदकाचा मानकरी कोणता कर्णधार ठरणार? हे पाहण्यासाठी चाहते सुद्धा आतुर झाले आहेत.
एक सामना, तीन सुपर ओव्हर अन् धुरळा; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा विक्रम