मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट

मुंबईगोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवटस्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्ते पावसाळ्य़ात अधिक धोकादायक ठरत आहेत. भोस्ते घाटातील अवघड वळण हे वाहनचालकांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे. सद्यस्थितीत परशुराम घाटातील काम अर्धवटस्थितीत आहे. कशेडी घाटाला पर्यायी बोगदा काढण्यात आलेला आहे. हे सारेच सुरळीत दिसत असले तरीदेखील या घाटातील अवघड वळणे जीवघेणी ठरत असून पावसाळ्यात या वळणाचा अधिक धोका संभवतो. त्याचबरोबर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचादेखील धोका आहे. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात घाटातून प्रवास बिकटच म्हणावा लागेल.