
नियमित आणि जबाबदारीने स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱयांनी सक्रियपणे काम करावे. मात्र, हे काम करत असताना दीर्घकालीन गैरहजर असलेल्या सफाई कर्मचाऱयांवर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात
शहर विभागातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामगिरीचा आढावा महापालिकेच्या एफ-दक्षिण विभाग कार्यालयात आज आयोजित बैठकीत जोशी यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. त्या म्हणाल्या, घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले स्वच्छता कर्मचारी नियमितपणे त्यांची जबाबदारी पार पाडत असल्याची खात्री संबंधित अधिकाऱयांनी करावी. 45 दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून एखादा कर्मचारी गैरहजर असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी. सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंत्यांनी ‘सचेत’ अॅपचा नियमितपणे वापर करावा तसेच संबंधित प्रशासकीय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी यावर नजर ठेवण्याचे निर्देश दिले.