धारावी हा भाजपचा जगातला सगळ्यात मोठा जमीन घोटाळा, अदानीला विरोध करणारच; आदित्य ठाकरे यांचा इशारा

धारावी हा जगातला सगळ्यात मोठा जमीन घोटाळा असू शकतो. मात्र भाजपला आम्ही हा घोटाला करू देणारा नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. आज धारावीमधील मेघवाडी येथील सगळे स्थानिकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “आज धारावीमधील मेघवाडी येथील सगळे स्थानिक मला भेटायला आले होते. या लोकांनी अदानी समूह आणि महाराष्ट्र शासनावर विश्वास ठेवून सर्वेक्षण करू दिलं. सर्वेक्षणामध्ये पहिल्याच यादीत 80 टक्के लोकांना अपात्र ठरवलं. मेघवाडीत हा समाज जवळपास 150 वर्ष तिथे राहत आहे. यात सगळे झोपडपट्टी क्षेत्र नाही. मात्र तरी देखील सर्वेक्षण केलं आणि त्यात 80 टक्के लोकांना अपात्र ठरवून यांना देवनारच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार. अदानी याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच. मुंबई ही नागोशेबल नाहीय. मुंबईसाठी आणि धारावीसाठी आम्ही लढत राहू आणि कुठल्याही मालकाच्या घशात आम्ही ही जाऊ देणार नाही.”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “धारावी पुनर्विकास प्रकल्पात दोन मागण्या महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे पात्रात ही 2022 कट ऑफ ठेवावी. दुसरं म्हणजे सगळीकडे एसआरएमध्ये तिकडच्या तिकडे रहिवाशांना घरे दिली जातात. यांनाही तिकडच्या तिकडे घरे मिळालीत पाहिजेत. कारण धारावी हा जगातला सगळ्यात मोठा जमीन घोटाळा असू शकतो. आता आमच्या कानावर येत आहे की, एफएसआय 1.33 चा प्राप्त होण्यासाठी अदानी हे शौचालयचे ही सर्वेक्षण करत आहे आणि ते देखील प्रॉपर्टीमध्ये दाखवत आहेत. म्हणजेच सार्वजनिक शौचालय असेल, कुठलं बेंच, पोल असेल हे देखील दाखवायचं सर्वेसक्षणात आणि मग त्याच्या अगेन्स्ट 1.33 चा एफएसआय घ्यायचा, हा आता अदानींचा प्रयत्न आहे. मात्र हा जगातला सगळ्यात मोठा जमीन घोळाला आम्ही भाजपला करू देणार नाही.”