
दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीत धम्माल मस्ती केल्यानंतर अखेर आजपासून शाळांमध्ये चिमुरड्यांचा किलबिलाट सुरू झाला. मुलांच्या स्वागतासाठी वरुण राजानेही हजेरी लावली.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)
पावसांच्या सरी अंगावर झेलत मुंबईसह महाराष्ट्रातील मुलं आपापल्या शाळांमध्ये दाखल झाली. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी मुलांवर पुष्पवृष्टी करत मुलांच शाळांमध्ये स्वागत करण्यात आलं.
मुंबईच्या सायन येथील बाबासाहेब देशपांडे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केलं. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.
बेंच पकडण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती.
त्यानंतर सर्व मुलांना राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पुस्तकांच वितरण करण्यात आलं.