
विजयाच्या जल्लोषाचे शोककळेत झालेले दुःखद रूप अवघ्या हिंदुस्थानी जनतेच्या पापण्या ओलावणारे ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह साऱयांनीच दुःखद, हृदयविदारक घटना या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या घटनेनंतर सारी यंत्रणा बंगळुरू पोलीस आणि राज्य सरकारवर तुटून पडली. तेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या या घटनेचे चौकशीचे आदेश देत ही घटना अत्यंत दुःखद आणि क्लेशदायक असल्याचे सांगितले. मी या घटनेची पाठराखण करणार नाही. यात कुणी दोषी असेल तर त्यावर कारवाई होणारच. मात्र अशा घटना अनेक ठिकाणी झाल्या असल्याचे सांगत त्यांनी या घटनेची पुंभमेळय़ाच्या चेंगराचेंगरीशी तुलना केली.
सुरक्षेच्या ढिलाईमुळे चूक झाली. ही घटना आश्चर्यकारक आहे. काही पातळींवर चुका झाल्या आहेत. योग्य खबरदारी घ्यायला हवी होती.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
या दुर्दैवी घटनेमुळे आम्हाला प्रचंड दुःख झाले आहे. आम्ही मृत परिवारांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. बंगळुरूतील गर्दीबाबत कळताच आम्ही आमच्या कार्यक्रमात सूचनेनुसार बदल केले. आम्ही सर्व चाहत्यांना विनंती करतो की, कृपया काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे.
– देवजीत सैकिया – बीसीसीआय सचिव