
रांगोळी पुसल्याच्या कारणातून कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी आठ वर्षीय बालकाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पुण्यातील भवानीनगरमध्ये ही घटना घडली आहे.
पीडित मुलाच्या आईचे निधन झाले आहे. वडील भंगारच्या दुकानात काम करून आपली उपजीविका करतात. दुपारी पीडित मुलगा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर सायकल चालवत होता. यावेळी मुलाकडून कारखान्यासमोरील रांगोळी पुसली गेली.
या क्षुल्लक कारणातून सुरक्षारक्षकाने मुलाला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे मुलाची पाठ काळी पडली. या घटनेनंतर परिसराती नागरिक संतप्त झाले असून सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत.