शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणे बंधनकारक

मराठीसह सर्वच माध्यमांच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर आता ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आले आहे. जी शाळा या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, त्या शाळेवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.

भंडारा येथे शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱयांना काही निर्देश दिले. मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवंदनेने गायले गेले पाहिजे. मराठी शाळेसोबतच आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणे बंधनकारक आहे, असे आदेश दादा भुसे यांनी दिले. पूर्वी चौथी आणि सातवीत शिष्यवृत्ती परीक्षा होत होती. त्यानंतर पाचवी आणि आठवीत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. मात्र, आता यानंतर चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य पथक किद्यार्थ्यांची तपासणी करणार आणि त्यानंतर किद्यार्थ्यांना एक हेल्थ कार्ड देणार आहे. हे हेल्थ कार्ड त्यांना आयुष्यात अनेक ठिकाणी उपयुक्त पडणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.