
महागाईने किचनचे बजेट कोलमडले असून सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच पावसामुळे तब्बल 40 टक्के शेतमाल खराब झाला असून बाजारातील भाजीपाल्याची आवक प्रचंड घटली आहे. त्याचा मोठा फटका सामान्यांना बसत असून रोज भाज्यांचे दर वाढत आहेत. हिरवा वाटाणा, शिमला मिरची, कोबी, वांगी या भाज्यांनी तर शंभरी पार केली असून 100 रुपये किलो मिळणारा हिरवा वाटाणा आज तब्बल 140 वर गेला.
हिरवे वाटाणे
आधी 100
आता 140
शिमला मिरची
आधी 60
आता 120
फ्लॉवर
आधी 60
आता 100
मेथी जुडी
आधी 20
आता 60
कोबी
आधी 80
आता 120
वांगी
आधी 80
आता 120
कारले
आधी 60
आता 80