उजनी धरणातून शेतीसाठी 20 जानेवारीनंतर पाणी, मार्च ते मे पर्यंत सुटेल दुसरे आवर्तन

उजनी धरणात सध्या 111 टक्के पाणीसाठा आहे. रब्बी पिकांसाठी उजनीतून पहिले आवर्तन 20 जानेकारीनंतर सोडले जाणार आहे. तसेच, 25 मार्च ते 25 एप्रिल आणि तेथून पुढे 20 मेपर्यंत एकच मोठे आवर्तन सोडले जाईल. त्यावर कालका सल्लागार समितीत अंतिम निर्णय होणार आहे.

उजनी धरण सोलापूर जिह्यासाठी वरदान ठरले असून, रब्बीच्या जिह्यात खरीप पिकांखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिह्यातील शेतीला कॅनॉलद्वारे पाणी मिळते. बार्शी उपसा सिंचन योजना, शिरापूर, सीना-माढा व दहीगाक उपसा सिंचन योजनेतून आणि बोगद्यातूनदेखील पाणी वितरित होते. धरणावरून जिह्यातील जवळपास पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सोलापूर शहरालादेखील उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. त्याशिवाय बारामतीसह सोलापूर जिह्यातील एमआयडीसींना आणि लातूर, धाराशिव शहरांनाही उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात शेती व जनावरांची तहान भागविण्यात उजनीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

जिह्यातील शेतकरी आत्महत्या कमी होऊन हरितक्रांतीची मुहूर्तमेढ उजनीनेच रोवली. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरचा नावलौकिक देशभरात झाला. मागील तीन-चार वर्षांत उन्हाळ्यात जिह्यात पाणीपुरवठय़ासाठी एकही टँकर लागलेला नाही, तेही उजनीमुळेच. यंदा पावसाळ्यात उजनी धरणावरील जलकिद्युत केंद्रातून 1.55 कोटी वीजनिर्मिती व्हावी, असे टार्गेट दिले होते. पण, पावसाळ्यात तब्बल तीन कोटी युनिट वीज तयार करण्यात आली. ही आतापर्यंतची सर्वाधिक वीजनिर्मिती ठरली आहे.

उजनीत सध्या 111 टक्के पाणीसाठा आहे. रब्बी आणि उन्हाळी आवर्तनांसंदर्भात पुढील महिन्यात पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कालका सल्लागार समितीची बैठक होईल. त्यामध्ये पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.