
पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना घरे मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय कधी घेणार? असा प्रश्न विधानसभेत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी सरकारला विचारला आहे.
यावेळी बोलताना सुनील प्रभू म्हणाले आहेत की, “गोरेगाव मिठानगरमधिल देखील मूनही महानगरपालिका वसाहत आहे. तेथील निवृत्त कर्मचाऱ्यांना महापालिकेने घर द्यावं, असं वाटतं. मुंबई महानगरपालिकेने रिडेव्हपलमेंट करावं, असा प्रस्ताव आहे. मुंबई शहरासाठी जसा म्हाडाच्या बाबतीत निर्णय केला, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या जमिनीवर राहणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना घरे मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय किती दिवसांत घेणार? याचा फायदा मुंबईतील सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल.”