
पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दिवा ते कोपर स्थानकात ही घटना घडली असून यात आणखी काही प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईहून लखनौला जाणाऱ्या गाडीत ही घटना घडली आहे.
कसाऱ्याला जाणाऱ्या गार्डने याबाबती माहिती दिली. कसाऱ्याला जाणारी लोकल आणि एक्सप्रेस बाजून जात होत्या तेव्हा गार्डला हे जखमी अवस्थेत प्रवासी दिसले. अनेक प्रवासी या एक्सप्रेसला लटकून प्रवास करत होते. दिवा ते कोपरदरम्यान हे प्रवासी पडले आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 ते 12 प्रवासी खाली पडले आणि पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पण हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप कळालेले नाही. या प्रवाशांची ओळख पटलेली नाही. दरम्यान रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.