
महिन्याकाठी 15 हजार रुपये पॉकेट मनी आणि घरकामात मदत यावरून एका पत्नीने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे. एक लग्न जवळपास मोडणार होतं पण कोर्टाने नेमलेल्या मध्यस्थांमुळे हे लग्न वाचलं आहे. अशा प्रकारे मोडणारं लग्न वाचण्याची घटना पहिलीच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2024 मध्ये या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. पण काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडायला सुरूवात झाली. आणि तीन महिन्यानंतर तरुणी माहेरी परतली. त्यानंतर दोघांमध्ये खुपच भांडणं झाली. मुलीने मुलाविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. तर मुलानेही मुलीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघांमध्ये वाद इतका वाढला की बाब सर्वोच्च न्यायायलापर्यंत पोहोचला. जानेवारीमध्येही सर्वोच्च न्यायालयाने हे लग्न वाचू शकत नाही अशी भिती व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर करण्यापूर्वी मध्यस्थांना काही मार्ग काढण्यास सांगितले. त्यानंतर या दाम्पत्यात मार्ग निघाला. मुलीला महिन्याला 15 हजार रुपयांची पॉकेट मनी, घरकामात मदत आणि दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्याचे ठरले. दाम्पत्याने काढलेला हा मार्ग पाहून न्यायमूर्तीही अवाक झाले होते