
काल मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आता आजही रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अलिगाब, रोहा, तळा, पोलादपूर आणि महाडमधील सरकारी आणि खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे पुण्यातही पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे स्वारगेट बस स्थानकात पाणी भरले आहे. मुंबई आणि ठाणे भागात काल रात्रीपासून संततधार सुरू आहे. दादर आणि माहीम भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.