
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास रोहित शर्मा व विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाची ड्रेसिंग रूम भकास वाटतेय. कारण रोहित किंवा विराट यापैकी एकजण तरी ड्रेसिंग रूममध्ये नाही, असे माझ्या कारकीर्दीत कधी घडले नाही, अशा शब्दांत के. एल. राहुलने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘मी आतापर्यंत 50 कसोटी सामने खेळलोय, मात्र रोहित किंवा विराट यापैकी एकजण नाही असा कोणताच कसोटी मी खेळलेलो नाही. त्यामुळे या स्टार फलंदाजांची उणीव नक्कीच आम्हाला भासणार. रोहित-विराट आता ड्रेसिंग रूममध्ये नाहीये, हे मानायला मन अजूनही तयार होत नाही. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये गेलं की एकदम भकास वाटतंय. मात्र रोहित-विराट आता निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निर्णयाचा आम्ही नक्कीच सन्मान करतो. या दोघांनी दशकभरात हिंदुस्थानी क्रिकेटला भरपूर काही दिलं आहे. आता त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी युवा पिढीवर असेल, असेही के. एल. राहुलने सांगितले.