दखल- डौलदार शब्दांचे पीक

>> नमिता कीर

मनाजोगी कविता सुचली की, कृतकृत्य झाल्यासारखं वाटायला लागतं. कविता ही माझी सखी, माझ्या आयुष्याचाच भाग झालेली आहे, असं म्हणणाऱया, गेली अनेक वर्षं कविता लेखनात मनापासून रमलेल्या कवयित्री गौरी कुलकर्णी यांचा ‘काजळखूण’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. एकूण 76 कवितांचा हा संग्रह, संख्यात्मकदृष्टय़ा तो वजनदार आहे, त्याचबरोबर विषयांचं वैविध्यही त्यात आहे. यात स्त्राrविषयक जाणिवांच्या कविता आहेत, निर्सगावरील, परमेश्वरी अस्तित्वावरील, सामाजिक भेदाविषयी, अगम्य मनाविषयी आणि मैत्री भावनेविषयही सुरेख कविता आहेत. त्यांच्या कविता वृत्तात आहेत, मात्रेत-छंदात आहेत आणि छंदमुक्त-मुक्तछंदातही आहेत. हा त्यांच्या कवितेचा स्वतःचा अभ्यास आहे. त्यांच्या कवितेत लय आहे. बालकवींची ‘एwलतटावर पैलतटावर हिरवळ लेवून निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून’ या कवितेतील लय जशी सहज लोभवते, तीच लय त्यांच्या कवितेत आ‘श्रावण’ या कवितेत त्या म्हणतात, “रुजून फुलात भिजून दवात, पेरतो चांदणे श्रावण जगात.’’

जगण्यातली अनुभूती, जी कवयित्रीच्या मनाचा संवेदनशील कोपरा व्यापून टाकते, ती अनुभूती कवितेतून इथे तिथे डोकावत राहते. वेदना ही दुःखदायीच असते. निवडुंगी वेदनेच्या वाटेवरूनी चालताना, तप्त उन्हाच्या ज्वाळांचं वर्णन करताना त्या म्हणतात, “रूप दुर्वासाचे घेई ऐन मध्यान्हीला ऊन.’’

संवेदनांना जाग आणणाऱया अनेक कविता या संग्रहात आहेत. मन चंचल, त्याचं वर्णन करताना त्या ‘फुलपाखरू मन हे उडते अधांतरी, जरा वाटते चिमटीत आले, पण नाही’ असं सहजपणे लिहून जातात. काही कविता चिंतनात्मक आहेत. माणसाचं वय वासंध्याछाया अवतीभवती फिरत राहतात. जगलेल्या आयुष्यातली वजाबाकी मनाला भेडसावू लागते. मन विषण्ण होते. अशा वेळी ‘उरले किती आयुष्य, मोजायचे कशाला आणि उगा उसासे टाकायचे कशाला?’ हा कवितेतला दिलासा मनाला धीर देऊन जातो.

पाऊस कवयित्रीला विशेष आवडतो. पावसावर एकूण चार कविता संग्रहात आहेत. पावसाचं रिमझिम बरसणारं रूप त्यांना आवडतं, पण तो अस्ताव्यस्त बरसू लागला की, त्या त्याला धिटाईने सुनावतातही…‘कधी असा, कधी तसा, नाही तुझा भरवसा, घाल मर्जीला वेसण, तोल सांभाळ पावसा.’’

भोवतालचं विषमतेचं वास्तवच असं भेदक आहे की, आज माणूस माणसापासून दुरावत चाललाय. जातीधर्माच्या नावावर समाजमन दुभंगतंय. माणूस वैफल्यग्रस्त झालाय. कवयित्रीच्या मनातही ही वैफल्यता दाटून येते म्हणून ‘कोडग्या मिंधेपणाची शिरजोरी कोठेच नव्हती अन् लांगुल चालनाची मुळीही मिजास नव्हती अलीकडे, पण षंचा शाप जळतो जीवना’ ही खंतही व्यक्त करतात.

स्त्राrच्या शोषणाच्या अनेक तऱहांपासून तिच्या आत्मभानापर्यंतचा प्रवास ‘माऊलीच्या गर्भी’, ‘मुंगी’, ‘आई’, ‘गांधारी’ अशा कवितांतून प्रकट झालेला आहे. “स्त्राr नव्हे नुसती मादी, ती माणूस आधी’’ असं कवयित्री पद्मा गोळे यांनी आधीच बजावून ठेवलंय. त्याच धर्तीवरची ‘गांधारी’ ही गौरी कुलकर्णी यांची कविता आहे. महाभारतातील या व्यक्तिरेखेकडे वर्तमानकालीन दृष्टिकोनातून गौरी कुलकर्णी यांनी पाहिलं आहे. परंपरानिष्ठ आकलनापेक्षा हे नवे आकलन आहे. “आजची ती मात्र एकटीच आहे. तिलाच त्याचे अंधत्व निभावून न्यायचं आहे. त्याच्या जगण्याचं बळ आणि संवेदना व्हायचं आहे. म्हणून गांधारी होणं आजच्या तिला विचारार्ह वाटत नाही तसं ते व्यवहार्यही नाही.’’

गौरी कुलकर्णी यांचा हा आत्मसंवाद आहे आणि या आत्मसंवादाशी त्या वाचकांनाही जोडून घेतील हे निश्चित! प्रकाशिका, कवयित्री, संपादिका लता गुठे यांच्या ‘भरारी’ प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठ, छपाई, मांडणी या सगळ्याच दृष्टीने त्यात सुबकता आहे.

काजळखूण

लेखिका ः गौरी कुलकर्णी

dरकाशक ः भरारी प्रकाशन

पृष्ठसंख्या ःमूल्य ः रु. 200/-