
>> डॉ.अविनाश सांगोलेकर
सध्याची मराठी गझलसृष्टी ही विपुल आणि विविध गझलकारांनी व्यापलेली आणि नटलेली अशी आहे. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. दिलीप पांढरपट्टे! मराठी गझल प्रस्थापित आणि प्रतिष्ठित करण्यात सिंहाचा वाटा असलेले कविवर्य सुरेश भट यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभून जी मराठी गझलकारांची पहिली फळी उदयास आली, त्यात डॉ. पांट्टे यांचा अंतर्भाव होतो. डॉ. पांढरपट्टे हे आय.ए.एस. अधिकारी असल्याने त्यांनी जिल्हाधिकारी, सचिव, विभागीय आयुक्त अशी अनेक उच्च पदे भूषवली आहेत. प्रशासकीय व्यस्ततेमुळे त्यांच्या हातून विपुल गझललेखन जरी होऊ शकले नसले तरी जे झाले आहे, ते मात्र निश्चितच गुणवत्तापूर्ण म्हणता येते.
डॉ. दिलीप पांढरपट्टे हे 1987 पासून सातत्याने गझल लिहीत आलेले आहेत. त्यांचा ‘उडवाच मान माझी’ हा बहुप्रतिक्षित गझलसंग्रह रसिकांसमोर आला आहे. संतोष घोंगडे यांनी रेखाटलेले आकर्षक आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ, डॉ. राम पंडित आणि अशोक बागवे या मान्यवरांचे मार्मिक अभिप्राय असलेले मलपृष्ठ, ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांची गद्यकाव्य म्हणता येईल, अशी प्रस्तावना, स्वत गझलकाराचे आटोपशीर मनोगत या सर्व जमेच्या बाजू तर आहेतच; पण एकाहून एक सरस अशा 84 गझलांनी हा संग्रह अधिकच समृद्ध, श्रीमंत, वाचनीय आणि म्हणूनच संग्राह्यसुद्धा झाला आहे.
हा संग्रह त्यांनी ‘जगण्याच्या वावटळीत पाचोळ्याप्रमाणे उडून गेलेल्या परागंदा क्षणांना…’ अर्पण केलेला आहे. या अर्पणपत्रिकेत या संग्रहाचे सूत्र सापडते. कारण याच क्षणांना त्यांनी आपल्या 84 गझलांमधून शब्दबद्ध केले आहे. संग्रहाला शीर्षक ज्या गझलेचे देण्यात आलेले आहे, ती ‘उडवाच मान माझी’ ही गझलही यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. ही गझल संग्रहात 22 व्या क्रमांकावर आहे. त्यात गझलकार ताठ मानेने जगण्याचा ठाम निर्धार व्यक्त करतो.
‘उडवाच मान माझी – माझा नकार नाही
इतकीच शर्त आहे – मी वाकणार नाही’
डॉ. पांट्टे यांची ही एकच गझल मुळापासून जरी आपण पाहिली तरी डॉ. पांट्टे यांचे गझलकार म्हणून असलेले सामर्थ्य आणि त्यांच्या गझलविश्वाचे सौंदर्य या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात. या संग्रहात ‘हझल’ या उपप्रकारातील एक गझल आ‘कुठे म्हणालो, परी मिळावी!’ ही ती गझल होय. 34 व्या क्रमांकाच्या या हझलेतील पुद्विपदी पहा ः
‘कुठे म्हणालो, ‘परी मिळावी!
फक्त जराशी बरी मिळावी!’
डॉ. पांट्टे यांच्या अनेक गझलांमध्ये कल्पनावैभवाने नटलेल्या द्विपदी (शेर) आउदा.
‘चिमण्या नि कावळ्यांनी जंगी सभा भरवली
आभाळ जिंकण्याचा तेथे ठराव झाला’
(‘संमेलनात उलटासुलटा’, पृ.64)
गझलेचा शेवट मक्त्याच्या द्विपदीने करणारे फार थोडे गझलकार मराठीत आहेत. डॉ. पांट्टे हे त्यांच्यापैकी एक होत. त्यांची एक लक्षवेधक मक्त्याची द्विपदी अशी ः
‘तुला न आहे दिलीप, पर्वा ऋतुबितूंची
आनंदाचे झाड तुझ्या तर मनात आहे’
(‘खरीच तू अन् खरीच ही’, पृ.26)
शेवटी इतकेच म्हणता येईल की, कधीकाळी सनदी अधिकारी राहिलेले डॉ. दिलीप पांट्टे हे एक मुळात कलंदर व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचे उत्कट दर्शन ‘उडवाच मान माझी’ या त्यांच्या गझलसंग्रहातून निश्चित घडते. ते एका गझलेत शेवटी म्हणतात,
‘इथे कुणाला ‘दिलीप’ आहे तुझी काळजी,अशा जगातुनी निघून जावे तूच, हे बरे!’
असे जरी ते म्हणत असले तरी समस्त गझलप्रेमींच्या वतीने आपण त्यांना उत्तरादाखल इतकेच म्हणूया की. ‘अहो, डा. पांट्टे, तुमची काळजी आम्हाला आहे बरं! म्हणून तुम्ही जगातून निघून जाण्याची भाषा इतक्यात करू नका बुवा! तुम्हाला अशाच सुंदर सुंदर गझला अजून लिहायच्या आहेत.
‘उडवाच मान माझी’
ढार ः डॉ. दिलीप पांट्टे
प्रकाशक ः डिंपल पब्लिकेशन
किंमत ः 200 रुपये