
महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेतजमिनीचे आणि नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले असून अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे बाधित झालेल्यांना पूर्वपदावर येण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने न्यास व्यवस्थापन समितीने 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.