वजन कमी करण्यासाठी तुमची फक्त पाच मिनिटं गरजेची आहेत, वाचा

अलीकडे आपल्या घरी जाण्या-येण्याच्या वेळाच बदलल्या आणि तिथेचे आपल्या सवयीही बदलल्या. म्हणूनच शतपावली म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडतो. शतपावली म्हणजे जेवणानंतर काही काळ चालणे. त्यालाच शतपावली असे म्हणतात. म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर किमान शतपावली म्हणजे शंभर पावले चालणे हे खूपच गरजेचे आहे.

आहारात पालक सूप पिण्याचे होतील अगणित फायदे, वाचा

वजन वाढण्याचे प्रमाण अलीकडे खूप वाढलेले आहे. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी अनेकविध उपाय केले जातात. वेळेच्या अभावामुळे आपण आरोग्याकडे बरेच दुर्लक्ष करु लागलो आहे. जेवण घाईघाईने उरकुन आपण सध्या झोपत आहोत. पण ही पद्धत अतिशय चुकीची आहे. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढतात. आपल्याकडे आजही जेवणानंतर लगेच झोपू नये असं सांगितलं जातं. पूर्वीची जुनी-जाणती माणसं कायम म्हणायची, की शतपावली करा. काय असेल बरं या सर्वांमागचं कारण… जेवणानंतर शतपावली करण्याची प्रथा आता बंद पडल्यातच जमा आहे.

जायफळ आपल्या सौंदर्यासाठी कसे महत्त्वाचे आहे, जाणून घ्या

रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये अंतर राहते. तसेच मुख्य म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्यामुळे आपली पाचन प्रणाली निरोगी राहते. पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्येपासून आराम मिळतो.

Health Tips- सर्दी-खोकल्यामुळे त्रस्त असाल तर, करुन बघा हे घरगुती रामबाण उपाय

रात्रीच्या जेवणानंतर चालणे देखील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते कारण ते तुमच्या प्रणालीतील विष बाहेर टाकते. हे आपल्या अंतर्गत अवयवांसाठी चांगले कार्य करते. एक मजबूत प्रतिकारशक्ती फ्लू, सर्दी आणि इतर अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते.

तुम्हाला तुमचे चयापचय वाढवायचे असेल तर तुम्ही जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी फिरायला जा. रात्रीच्या जेवणानंतर चालून तुम्ही वजन कमी करू शकता. शिवाय जर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर चालणे खूप फायदेशीर आहे. रात्रीच्या जेवणानंतर किमान काही वेळ चालणे हे खूप गरजेचे आहे.