रेल मंत्री की रील मंत्री! आदित्य ठाकरे यांचा सवाल

गेल्या वर्षभराच्या काळात रेल्वे अपघातात शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला. असे असताना रेल्वे सुविधांबाबत सुधारणा होत नाही. आताही मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्याल, पण इतर प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांचा फोकस मुंबईवर नाही. त्यामुळे सध्या ‘रेल मंत्री’ आहेत की ‘रील मंत्री’ आहेत असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.