Air India Plane Crash – अपघाताच्या वेळी तापमान पोहोचलं होतं एक हजार अंश सेल्सियसवर, प्रवाशांसोबत वितळलं विमान

**EDS: SCREENSHOT VIA PTI VIDEOS** Ahmedabad: Firefighting team at the spot after an Air India plane crashed in Meghaninagar area, near Ahmedabad airport, Thursday, June 12, 2025. (PTI Photo)(PTI06_12_2025_000116B)

 

लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अहमदाबादमध्ये कोसळलं. या अपघात 290 जणांचा मृत्यू झाला आहे. या वेळी विमानात आग लागली आणि तापमान एक हजार अंश सेल्सियसवर पोहोचले. त्यात प्रवाशांसह विमानी वितळून गेलं.

अधिकाकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोसळल्यानंतर आग लागली आणि तापमान एक हजार अंश सेल्सियसवर पोहोचले होते. त्यामुळे बचावकार्य करण्यात अडथळे येत आहे. या आगीमुळे निर्माण झालेल्या तापमानात जगणं अशक्य आहे. विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन पेटल्यावर कुणाच्याही जिवंत राहण्याची शक्यता कमीच होती.

SDRF चे जवान घटनास्थळी पोहोचले पण तापमान इतके होते की बचावकार्य करताना अडचण येत होती. सगळीकडे ढिगारे आणि जळालेले अवशेष होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 265 मृतदेह रुग्णालयात आणले आहेत.