खोया खोया चांद – मिर्झा गालिब

>> धनंजय कुलकर्णी

हिंदुस्थानमध्ये चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याची सुरुवात 1954 सालापासून झाली. त्या वर्षी पहिला राष्ट्रीय पुरस्कार आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला मिळाला. यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 1955 सालच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णपदक सोहराब मोदी दिग्दर्शित ‘मिर्झा गालिब’ या चित्रपटाला मिळाले. याचाच अर्थ ‘मिर्झा गालिब’ हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता हिंदी सिनेमा ठरला. आज हा चित्रपट रसिकांच्या विस्मरणात गेला असला तरी यातील गाणी आजदेखील म्ल्त्t म्त्assग्म्s म्हणून ओळखली जातात. या चित्रपटात आठ गाणी होती. यातील बहुतांश गाणी fिमर्झा गालिब यांच्याच लेखणीतून आलेली होती. या चित्रपटाचे कथानक ‘द ग्रेट’ सदाहत हसन मंटो यांचे होते, तर पटकथा आणि संवाद राजेंद्रसिंह बेदी यांनी लिहिले होते. हा सिनेमा 10 डिसेंबर 1954 रोजी प्रदर्शित झाला. योगायोगाने येत्या 10 डिसेंबरला हा चित्रपट सत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहे.

कधी कधी आपल्या हातून झालेल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधूनदेखील अनपेक्षितपणे खूप मोठी गोष्ट अचूकपणे घडून जात असते. मिनर्व्हा मुव्हिटोनचे दिग्दर्शक सोहराब मोदी यांना असाच अनुभव आला होता. पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीस एकदा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना 14 नोव्हेंबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी एक पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी ‘मिर्झा गालिब’ या शायराच्या काही ओळी उद्धृत केल्या होत्या. त्या अशा होत्या, ‘तुम सलामत रहो हजारो बरस, हर बरस के दिन हो पचास बरस!’ पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रसिक, दिलदार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. त्यांना या ओळी खूप आवडल्या. त्यांनी उलट टपाली सोहराब मोदी यांना आभाराचे पत्र पाठवलेच, शिवाय दिल्लीत आल्यानंतर भेटायलादेखील बोलावले. सोहराब मोदी जेव्हा नेहरूंना भेटायला गेले त्या वेळी गप्पांचा विषय अर्थातच मिर्झा गालिब हाच होता. मिर्झा गालिब यांच्या विषयी पं. नेहरूंनादेखील खूप आस्था होती. दोघांची आवड एक असल्यामुळे गप्पा खूप रंगल्या. गप्पांचा शेवट पंतप्रधान नेहरूंनी सोहराब मोदी यांना, “तुम्ही मिर्झा गालिब यांच्यावर एक चित्रपटच का बनवत नाही?” असा प्रश्न विचारून केला. साक्षात पंतप्रधानांनीच मिर्झा गालिब यांच्यावरील चित्रपटाची विचारणा आणि आग्रह केल्यानंतर अर्थातच सोहराब मोदी यांनी त्याच्यावर काम सुरू केले.

हिंदुस्थानी सिनेमाच्या इतिहासात मुगलकालीन चित्रपटांचं एक आगळंवेगळं स्थान आहे. अशा विषयांना रुपेरी पडद्यावर आणण्याचे प्रयत्न नामांकित दिग्दर्शकांनी फार चांगल्या पद्धतीने केले. मुगलकालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण, मुगलकालीन वास्तुरचना, त्यांची सौंदर्यदृष्टी, तिथली अदब, दरारा, त्यांच्यातील प्रेम, ाढाwर्य आणि औदार्य या साऱयाचं प्रतिबिंब या सिनेमातून पडत असल्याने प्रेक्षक या कलाकृतीच्या वाटेवर डोळे लावून बसत. प्रस्तुत चित्रपटात गालिबच्या भूमिकेत भारतभूषण होते, तर त्यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत सुरैया होती. सिनेमाचे कथानक ‘आखरी मुगल बहादूरशहा जफर’ यांच्या काळातील आहे. मिर्झा गालिब (1797-1869) यांचं उर्दू साहित्यातील स्थान फार मोठं होतं. बहादूरशहा जफर यांच्या दरबारातील ते मोठे शायर होते. सोहराब मोदी भव्यदिव्यतेचा ध्यास असलेला कलावंत होता. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी ब्रिटिशकालीन राजवटीत इथल्या राजांच्या नशिबी आलेलं अदृश्य पारतंत्र्य व त्याची समाजाच्या साहित्यिक, सांस्कृतिक जीवनावर पडलेली गडद छाया फार सुंदर रीतीने दाखविण्याचा प्रयत्न केला. मिनर्व्हा मुव्हिटोन या आपल्या चित्रसंस्थेमार्फत सोहराब मोदी यांनी सिनेमाची निर्मिती सुरू केली.

भारतभूषण आणि सुरैया यांना घेऊन बनवलेल्या या सिनेमामध्ये ‘मिर्झा गालिब’च्या आयुष्याच्या संपूर्ण पोट्रेटला अतिशय सुंदर रीतीने चितारले गेले होते. गालिबच्या गझल तलत महमूद आणि सुरैया यांच्या स्वरात संगीतकार गुलाम महंमद यांनी गाऊन घेतल्या होत्या.‘दिल ए नादान तुझे हुआ क्या है’, ‘नुक्ता ची ऐ गमे दिल उनको सुनाये न बने’, ‘ये न थी हमारी किस्मत के विसाल ए यार होता’, ‘फिर मुझे दिदार ए तर याद आया’ या गा}िबच्या गझल सर्वार्थाने रसिकांपर्यंत पोहोचल्या त्या या सिनेमाम्ळेच. गालिबच्या रचना अगदी सामान्यांपर्यंत पोहोचल्या होत्या हे दर्शविण्यासाठी या चित्रपटात एक गीत होते, ‘कहते है की गालिब का है अंदाज ए बया और…’ आणि हे गीत रस्त्यावरील एक फकीर गाताना दाखवला आहे. या चित्रपटात बहादूरशहा जफर यांची भूमिका इफ्तेकार या अभिनेत्याने केली होती. चित्रपटात दुर्गा खोटे, निगार सुलताना, मुराद यांच्यादेखील प्रमुख भूमिका होत्या. अभिनेता भारत भूषण मिर्झा गालिबच्या भूमिकेत अगदी फिट बसला होता. त्यातील दोन गाणी शकील बदायुनी यांची होती. सिनेमाचे छायाचित्रण व्ही. अवधूत (‘प्रभात’कालीन सिनेमॅटोग्राफर व शांतारामबापूंचे बंधू) यांचे होते. आज गुलाम महंमदची आठवण सांगणारे जे काही मोजकेच सिनेमे आहेत, त्यात ‘पाकिजा’सोबत या सिनेमाचेदेखील नाव घ्यावे लागेल. या सिनेमाचा खास शो पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासाठी दिल्लीत आयोजित केला गेला. ‘तुमने मिर्झा गालिब की रूह को जिंदा कर दिया…’ असे गौरवोद्गार पंडित नेहरू यांनी काढले होते. दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सोहराब मोदी यांना हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक सोहराब मोदी यांनी पंतप्रधान पंडित नेहरूंना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रातील एका शेरमुळे या चित्रपटाची निर्मिती झाली. पुढे ‘सुजाता’ या चित्रपटाच्या वेळी गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी गालिबच्या याच शेरचा आधार घेत एक गाणे लिहिले, जे अफाट लोकप्रिय झाले आणि आजदेखील प्रत्येक वाढदिवसाच्या वेळी या गाण्याचा उल्लेख होतो. ते गाणे होते ‘तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार…!’
गुलजार यांचा ‘मिर्झा गालिब’

हिंदी आणि उर्दू साहित्यासोबतच एकूणच हिंदुस्थानी साहित्य आणि साहित्यिकांवर गालिबचा मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. ख्यातनाम गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी ‘दिल ढूंढता है फिर वोही फुरसत के रात दिन…’ या गाण्यातील मिर्झा गालिब यांचाच होता. गुलजार यांनी ऐंशीच्या दशकामध्ये मिर्झा गालिबवर एक अप्रतिम दूरदर्शन मालिका निर्माण केली होती. यात गालिबच्या भूमिकेमध्ये नसरुद्दीन शहा होते. या मालिकेला संगीत जगजीत आणि चित्रा सिंग यांनी दिले होते आणि यातील गालिबच्या सर्व रचना त्यांनीच गायल्या होत्या.
dsक्ल्त्21@gस्aग्त्.म्दस्
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

[email protected]